शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

उदयनराजेंनी चिथावणीखोर वक्तव्य करू नये -चंद्रकांत खंडाईत : देशाच्या सर्वोच्च सभागृहात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:02 IST

सातारा : कोरेगाव भीमा घटनेसंदर्भात सर्वोच्च सभागृहात लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडून दंगलखोर तसेच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा केली.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी या नात्याने सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करायला हवाकोरेगाव भीमा प्रकरणात तसेच सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा.

सातारा : कोरेगाव भीमा घटनेसंदर्भात सर्वोच्च सभागृहात लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडून दंगलखोर तसेच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा केली. त्यावेळी गप्प बसलेले साताºयाचे लोकप्रतिनिधी बाहेर मात्र चिथावणीखोर वक्तव्ये करतात. खासदार उदयनराजे भोसले यांनी संसदेत भूमिका मांडावी,’ अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खंडाईत यांनी म्हटले आहे की, खासदार उदयनराजे भोसले यांनी खरे तर वढू या गावी जाऊन छत्रपती संभाजीराजे यांचा अखेरचा इतिहास समजून घ्यावा. त्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या शूरवीरांनाही समजून घ्यावे. नंतर ही दंगल कोणत्या विचाराने घडवण्यात आली याचा विचार करूनच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांची महती लोकांना सांगावी. ज्या विचारसरणीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचेही विद्रूपीकरण केले. त्यांचे समर्थन आपण केले. २१ व्या शतकात वंचितांना न्याय मिळावा म्हणून निर्माण केलेल्या अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टलाही विरोध केला. त्यामुळे आपणही मनुस्मृतीच्या व्यवस्थेला बळी पडलेला आहात. यावरूनच कोणाची लायकी काय आहे, हे जनतेला समजून येईल.

खंडाईत यांनी पुढे म्हटले आहे की, साताºयाचे लोकप्रतिनिधी खासदार उदयनराजे भोसले यांनी मी जातपात मानत नाही, असे गुळगुळीत शब्द वापरून नंतर ३५ टक्के बाहेर पडले तर काय? आणि बाकीचे किती टक्के आहेत, असे चिथावणीखोर वक्तव्ये केली. याचा भारिप बहुजन महासंघ व समविचारी पक्षांच्या वतीने तीव्र निषेध आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी एका समूहाला जवळ आणि एका समूहाला दूर सारून पक्षपातीपणाची भूमिका बजावू नये. तसेच त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी तेड निर्माण करण्याचा प्रयत्नकेला जात आहे. हे चुकीचे आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात तसेच सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा. निवेदनावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, सिद्धार्थ खरात, विशाल भोसले, गणेश भिसे, जयवंत कांबळे उपस्थित होते.सामाजिक सलोखा राखावा‘लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी एका समूहाला जवळ आणि एका समूहाला दूर सारून पक्षपातीपणाची भूमिका बजावू नये. तसेच त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा,’ असे आवाहनही चंद्रकांत खंडाईत यांनी पत्रकार परिषदेत केले.